प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-बीड जिल्हयात मुलींच्या घटत्या जन्मदरावर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र चिंता*

  *बीड जिल्हयात मुलींच्या घटत्या जन्मदरावर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र चिंता*





*आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही*


*पुन्हा एकदा मुलींच्या जन्मासाठी प्रबोधन, जनजागृतीची सुरू करा*

🔸 MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

बीड ।दिनांक १६।

बीड जिल्हयात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी होत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी च्या सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुलींना नाकारले जात असल्याने जिल्हयात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही असे सांगत मुलींचा जन्मदर पुन्हा वाढविण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आवर्जून बघा: खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेले वाढदिवसानिमित्त चे आवाहन.

  पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ ७६४ मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे पीसीपीएनडीटी च्या अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावर बोलतांना पंकजाताई मुंडे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

आवर्जून वाचा: संपादक ज्ञानोबा सुरवसे यांनी लिहिलेला वाढदिवस विशेष लेख.

   पंकजाताई म्हणाल्या, २००९ साली जेव्हा मी राजकारणात आले, तेव्हा जिल्हयात मुलींचा जन्मदर राज्यात सर्वात कमी होता. या गोष्टीविषयी मनात तीव्र दुःख बाळगून यावर एनजीओ च्या माध्यमातून मी खूप काम केलं. जेव्हा महिला बालविकास मंत्री आणि जिल्हयाची पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली तेव्हा मी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी पहिली योजना जाहीर केली आणि याचा चांगला परिणाम होऊन जिल्हयात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९६१ मुली असा झाला होता.  जन्मदराचे अत्यल्प प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झाले, पुन्हा त्याच ठिकाणी  नेऊन ठेवण्याचे काम आताच्या कारभारामुळे होत आहे, याचा मी तीव्र निषेध आणि नापसंती व्यक्त करते. 

आवर्जून वाचा: राजेंद्र लोढा यांनी लिहिलेला खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त चा विशेष लेख.

*पुन्हा जनजागृती सुरू करा*

---------------

बीड जिल्हयात गेल्या दोन वर्षांत पीसीपीएनडीटी ॲक्टचे व्यवस्थित पालन न झाल्याने मुलींचा जन्मदर घटला असल्याचे यावरून दिसत आहे. याचा अर्थ मुलींना नाकारले जात आहे. कुठेतरी अशा घटना घडत आहेत आणि यावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही. जिल्हावासियांना मी आवाहन करते की, जसे आपण 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजनेला खूप छान प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद पुन्हा  द्या. प्रबोधन, जनजागृतीमध्ये सर्वांनी सहभाग घ्या, जिल्हयाचे हे चित्र पुन्हा दिसू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहन केले.

* 🔸 MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या