पोस्ट्स

इमेज
आश्वासनाची पूर्ती ; ना.पंकजा मुंडेंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्त्याचे चौपदरीकरण होणार ; भरीव निधीची तरतूद  मुंबई।दिनांक २१। परळी मतदारसंघातील बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्ता रुंदीकरणाला आता गती येणार असून यासाठी भरीव निधीची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे, या कामासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.    विधानसभा निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना ना. पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत  बर्दापुर ते लोखंडी सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी केली होती, हा रस्ता अरूंद असल्याने यावर वारंवार अपघात झाले होते, त्यामुळे ही मागणी पुढे आली होती, यावर गडकरी यांनी रस्त्यासाठी लवकरच निधी देऊन काम सुरू करू असे आश्वासन दिलं होते. याच मागणीसाठी ना.पंकजाताईंनी गडकरी यांची दिल्ली येथे भेटही घेतली होती. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या २०२५-२६ च्या वा...
इमेज
काव्या महिला कॉलेजच्या वतीने संत गजानन महाराज दिंडीस फराळ वाटप! अंबाजोगाई प्रतिनिधी :- आज अंबाजोगाई येथे संत गजानन महाराज यांची पालखीचे आगमन झालं असता काव्या महिला महाविद्यालय तर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता.      अंबाजोगाई येथे संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले असता कॉलेजच्या मुलींनी व महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला काव्या महिला  महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जयंत करपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काव्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या करुणा लोमटे मॅडम,फॅशन डिजाईन प्राध्यापिका शीला गायकवाड मॅडम ,आदमाने मॅडम पूजा नरवाडे मॅडम ,प्रा शिशिकात राडे ,प्रा मुकुंद काळे आतीश आदोडे ,विकास वाघमारे सर सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सर्व दिंडीतील वारकरी यांना फराळ वाटप केला.
इमेज
  श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत भक्तीमय वातावरणात स्वागत ज्ञानोबा-तुकाराम च्या जयघोषाने शहर दुमदुमले अंबाजोगाई(वसुदेव शिंदे)  श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी दुपारी अध्यात्मिक परंपरा लाभलेल्या अंबाजोगाई शहरात आगमन झाले.  शहरातील महिला,पुरुष भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम च्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषात एका पाठोपाठ सुंदर चालीवर भजने म्हटली जातात  प्रस्थानाच्या मार्गावर शहरांमध्ये विविध ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा करण्यात आली पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठी अध्यात्मिक परंपरा असून या पालखी सोहळ्यात शेगाव येथून अश्व आणि मोठ्या संख्येने वारकरी सहभागी असून यात काही टाळकरी तर काहींच्या हाती भगव्या पताका आहेत.  श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध...

अनुभूती वारीची.....!✍️ संतोष कुलकर्णी

इमेज
  वारीची नादमय झुळूक – परळी ते अंबाजोगाई पहाटे पाच वाजता परळी मधून श्री गजानन महाराजांची पालखी अर्थात दिंडी अंबाजोगाईच्या दिशेने मार्गक्रमण करणार होती.आम्ही सगळे पहाटे परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा मंदिराच्या प्रांगणामध्ये जमा झालो होतो.शहरातील हजारो महिला भगिनी ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष करत होते.पालखी अंबाजोगाई च्या दिशेने रवाना होण्याचा क्षण म्हणजे नव्या मुक्कामाच्या दिशेने पडलेले पाऊल.........परळी ते अंबाजोगाई हा 24 किलोमीटरचा प्रवास कसा होणार. हे सुरुवातीला मला वाटत होते.परंतु वारकरी बंधू-भगिनींच्या समवेत हा घाट चढून जाताना शहरात कधी पोहोचलो हे कळालेच नाही. परळी शहरालगत असणाऱ्या बालाघाट डोंगरांच्या घाटातून उतरती होती ती एक केवळ यात्रा नव्हे… ती होती एका विश्वासाची, भक्तीची, परंपरेची आणि नादमयतेची नदी ! परळीच्या उंच टेकाडांवरून जेव्हा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची दिंडी अंबाजोगाईच्या दिशेने मार्गक्रमण करत होती, तेव्हा अवघं वातावरणच भारलेलं होतं.दररोजच्या संसारातील ,ताणतणाव कधीच विसरून गेले होते.ऐकू येत होता फक्त श्री गजाननाचा जयघोष.या वारीमध्ये मी तादात्म्य होणं काय...
इमेज
  काळाचा दुर्दैवी घाला: सर्पदंशाने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू  परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)      तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील सार्थक शिवाजी पोईनकर या अडीच वर्षीय मुलाचा घरातच सर्पदंशाने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२१) सकाळी घडली आहे. यामुळे अतिशय गरीब कुटुंबावर काळाने घाला घातला.               तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी पोईनकर अतिशय गरीब कुटुंबातील असून घरात अडीच वर्षांचा मुलगा सार्थक एकटाच खेळत असताना अचानक कुठून तरी आलेल्या सापाने दंश केला. साप एवढा जहरीला होता की मुलाचा जागीच मृत्यू झाला. साप चावल्यानंतर  तो अडगळीला पडलेल्या जुन्या पेटीत जावून बसला. सार्थकला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता. सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तोपर्यंत या मुलाला नेमके काय झाले ते कळत नव्हते. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर घरातील सदस्यांनी घरात इतरत्र पाहिल्यास त्यांना अडगळीला पडलेल्या पेटीत हा साप आढळून आला. एका गरीब घरातील हसण्या खेळत्या अडीच वर्षांच्या म...
इमेज
आर्य समाज मंदिर दयानंद व्यायामशाळा येथे योगदिन साजरा  परळी -वै (प्रतीनिधी) 11वा जागतिक योग दिन आर्य समाज मंदिर दयानंद व्यायाम शाळा येथे साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगासनास मान्यता देणारा दिवस आहे 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.  शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो व या दिवसाच्या माध्यमातून योगासनाचे फायदे सांगितले जातात योग दिनाच्या सुरुवात आंतरराष्ट्रीय संतुलन आणि शांती यासाठी आज दिवस प्रोत्साहन  देण्यासाठी करण्यात आज साजरा करण्यात आला. समाजात एकता शांतता आणि सौहार्दता वाढविण्यासाठी जागतिक स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज जगभरात विविध स्तरावर याचा सराव म्हणजेच योगासनाचा सराव दैनंदिन जीवनामध्ये विविध वयातील लोक करत आहेत आणि याची लोकप्रियता दिवसेंदिवस बाल वया पासून प्रौढ वयापर्यंत च्या सर्व व्यक्तींमध्ये आणि सार्वत्रिक याची लोकप्रियता वाढतच जात आहे याचे सर्व आव्हान ओळखून भारताच्या पंतप्रधानांनी याची संयुक्त राष्ट्र संघ...
इमेज
अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदते !  "वैद्यनाथ" मधील योगदिनी डॉ. नयनकुमार आचार्य यांचे विचार     परळी वैजनाथ- (दि.२१)  सद्य परिस्थितीत वाढत्या शारीरिक, मानसिक विकारांना दूर करण्यासाठी "योग" हा मौलिक उपाय असून अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदू शकते, असे प्रतिपादन योग अभ्यासक डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले.            येथील वैद्यनाथ महाविद्यालयात काल (२१) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित योगासन, प्राणायाम व ध्यान शिबिरात ते प्रमुख प्रशिक्षक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ .जे.व्ही. जगतकर यांनी केले.               या शिबिरात श्री आचार्य यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम, विविध आसने , भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम व ध्यानमुद्रा आदींचे प्रशिक्षण दिले. तसेच योगाच्या यम, नियम, ...