स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना
वडगाव -निळा रेल्वे स्थानकावरील विलंबाचा प्रश्न निकाली; गाड्यांचा थांबा आता फक्त ५–१० मिनिटांवर परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी-वडगाव रेल्वे स्थानकावर गाड्या विनाकारण दोन-दोन तास थांबत असल्याच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या गंभीर मुद्द्यावर स्थानिक वृत्तपत्रांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली असून, आता गाड्यांचा थांबा केवळ ५ ते १० मिनिटांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी या स्थानकावर रेल्वे गाड्या अनावश्यकपणे दीर्घकाळ थांबविल्या जात असल्याचे प्रकार समोर आले होते. प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी ठळकपणे बातम्या प्रसिद्ध करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. या बातम्यांची गंभीर दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तांत्रिक बाबींची तपासणी करून विलंबामागील कारणांचा शोध घेतल्यानंतर तातडीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. परिणामी, गाड्यांचा अनावश्यक थांबा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय, स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना करण...